सोमवार, १७ ऑक्टोबर, २०११

तू .....

रे तुझ्या जीवनाचे गाणे गाणे व्हावे
डोळ्यांत सारी अश्कांच्या मी गाणे गात भिजावे

सोनसळी हास्याने सारे जग उजळावे
ते हिरवे श्रावण रावे उंच उंच लहरावे

कुण्या बंदिशीने का गीत तुला ठरवावे
मुक्त छंद कविता तू मुक्त मुक्त बहरावे

मी धावे कस्तूरहरिणी तू माझे मृगजळ व्हावे
तू आन्तर मम असतांना मी तुझ्यात आणि वसावे

मी अर्धरात्रीचा सविता तू पूर्णसूर्य प्रकाशावे
मी अर्धमुर्धसे जगणे तू पूर्णविरामा यावे

तू विश्वरूप दर्शावे मी पार्थ श्रीकृष्ण व्हावे
तू स्वहस्ते मारावे मी कंस होऊनी यावे 

मी आणि काय करावे मी आणि काय लिहावे
तू सोडून तोडून जाणे श्वासांतून जगणे जावे.
                                                         -कौमुदी.


शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

जर.....

हळदुलं कुंकू तुझ्या नावे लावलं असतं.
नवा पदर धरून हाती कोरभर लाजले असते.
भिजलेल्या श्रावणात
प्राजक्ताचा अब्दागीर
पाठवणी परतणी
सजलेली मंगळागौर
झिम्मा फुगडी सारे खेळ
खेळून दमले असते.
मिटले असते तुझ्या कुशीत
अंकुरात उमलले असते.
सजली वेल पाहिली असती,
चिमणा चिमणीचं धडकं घरट
भांड्याला भांडं लागून
चहाच्या पेल्यात वादळ हरतं.
जाऊन येऊन ऊन पाऊस
आपली छपरं पिकली असती.
दमा खोकला डायबेटीस
थोडी बायपासही सांभाळली असती.
खाल्ले असते चटके सोबत
पिकली पानं गळली असती.
कित्ती छान झालं असतं .......
........जर तुला आसवं कळली असती.

                                             -कौमुदी.




ऑयस्टर

हवं ते घेऊ देत मला
परिघातून हात बाहेर काढून
आणि नको बाहेरची हवाही
शिंपल्यात आधारानं जगणारा
ऑयस्टर आहे मी!

Let the people fetch
the pearl made by me
मला मोती गेल्याचं दु:ख नाही
आणि ओझं केल्याचाही.....
लाजाळूचं झाड समाज वा
वारुळातला सर्प ...काहीही
नकोय स्पर्श कशाचाच
विषाचा दंश ...
फुत्कारही सोडायचा नाही.

Any way, तुला नाही कळणार ते
दगडाच्याही exhibitionची  fashion झालीये.

                                                        -कौमुदी.

THE CRUX IN CRUSIFICATION OF A GRIEF


Writing is the part of my life alike my thoughts. Thoughts are endless and effortless. I always try to reduce my thoughts into writing but it is not always possible just because thoughts are double-sided sword. When my own thoughts will kill me? ….. No Idea!! My readers may have the thought that why the caption of my articles is “THE CRUX IN CRUSIFICATION OF A GRIEF”.

The reason is that I am a very sentimental person. The first book I read in my childhood was “Shyamchi Aai” (Shyam’s Mother) in my mother tongue Marathi. It made my feelings towards human relationship. It gave me the sense of thinking by heart rather than brain. For me, the book played the role of pathfinder. It overgrew my heart, feelings and emotions. I was always thinking I’m very lucky and blessed that I’m not heartless. My eyes are full of tears and my heart is made with kindness, compassion and love for all. I’ve a sense of emotion in this ruthless cruel world. How lucky I’m!!!

            I was wounded many a time. I’d distributed roses and what I’d achieved?  Crown of thorns.!? The people in my circle of affection never returned to me with the same thing. Does the person who love always has the responsibility to love and not the right to be loved? I was always thinking. In certain situations, if I changed my behavior, their behavior towards me always had a change. They never thought why I behaved so and left me alone with wounded heart. Why did my relatives friends not paid attention on my emotional want? I went on thinking. Why this happened to me? Was I wrong in asking their attention in my difficult and sorrowful days? Wasn’t I precious for them? Was there any basic fault in my behavior? Why? This ‘why’ trodden me a lot.

I went on thinking for the answer of my question. I thought ‘In this merciless world ‘who cares’ for the emotions? I’m wrong. I was wrong in choosing my ideal personality. “Sane Guruji” the writer of the book “Shyamchi Aai” was wrong. Why love others if they don’t respond rather they don’t love you? My eyes filled with tears and the heart with anger. I strongly decided ‘Now I’ll hurt the world. I’ll teach a lesson to all of them who hurt me. And I actually tried it. When at first I hurt my trees to reduce my thoughts in an action plucked it’s leaves, blossom and tried to cut it off. As I went on doing it tears were falling down from my eyes. My heart filled with the feeling of self hatred ness. I realized that I was hurting my own and I will do the same if I hurt anybody anymore. (That much I loved everybody in my circle of affection) I left my act and was crying. I did not realize what time I slept. Next day morning I arose and what I saw?! The flowers of the trees which remained unscratched were blooming, laughing with the air. They hadn’t any sense of my hard heartedness. They were enjoying their morning with what they had. Again there were tears in my eyes. No need of words. I got my answer.

            Now I realize better my nature. Neither my heart was wrong nor my idol. If there was anything wrong that was my attitude towards the feelings. We all do the same mistake. Relations do not create on give and take policy. How can we forget this? If we love anybody it is for ourselves and it we hate this is also for our own parameters. We all love the only person and that is “I”. “I” is the only cause of happiness and all kind of sadness also. This is the only grief. And the highest madness is that we can not forget this grief. We all want to get rid of it and we can’t so I thought it is the crucial point in the progress towards happiness. How can we forget “I” with “I” for “I”? This is the crucial point I felt and hence I started writing on “THE CRUX IN CRUSIFICATION OF A GRIEF”
            I don’t know how many of you agree on this rather read this for being agree.
            Again as I wrote I don’t care. I’m done with my work.

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

तू यावे म्हणुनी .......

         माझ्या ऑफिसला जाण्यायेण्याच्या रस्त्यावर स्मशान आहे.आज सकाळी सकाळी तिथे एक चिता धडधडत होती. कोण गेलं होतं, स्त्री कि पुरुष तरुण कि म्हातारा ठाऊक नाही. कधीचाच अग्नी दिलेला असावा सकाळच्या प्रशांत वेळी ज्वाळा चांगल्याच उंच होत्या. थकल्या भागल्या त्या जीवाला वन्ही आपल्या मांडीवर चिरविश्रांती देत होता. मृत्यू कवेत घेऊन निघाला होता निजधामाला. जळती चिता एकाकी सोडून गेलेल्या नातेवाईक, आप्तांची कणव आली आणि मृताच्या साठी समाधान... किती भाग्यशाली आहे हा माणूस! मृत्यूने आपल्या जवळ घेतले आहे याला....
          सकाळ सकाळ यमधर्माच्या पाऊलखुणा पाहून खरं तर सुखावले मी म्हणून हे सारे विचार माझ्या मनात आले. तुम्ही म्हणाल अमंगळाचे दर्शन झाल्यावर कसले सुख होते कुणास ठाऊक? मला सुख आहे ते मृत्यूचे अस्तित्व जाणवून. (कुणाच्या मृत्यूचे सुख वाटावे इतकी निर्मम नाहीये हो मी) मृत्यूचे फार फार आकर्षण आहे मला... कवी म्हणून कल्पना म्हणून नव्हे... माणूस म्हणून. (जीवन दु:खी आहे असेही नव्हे)प्रेयसीला प्रेयासाचे असते तितके आणि  तसे आकर्षण आहे... ओढ आहे... वाटले तर प्रेम आहे...
           एक खूप खूप गोड स्वप्न आहे माझे...'एक सुंदर ओटी, ओवऱ्या आणि मागचे पुढचे मोकळे झाडामाडांनी डवरलेले आंगण असलेले कौलारू घर असावे. दाराच्या पायथ्याशी पहाटेपहाटे प्राजक्त सुगंधाच्या चवऱ्या ढाळत असावा... पहाटवारे मंद वाहत असावे... मखमली गवतावरल्या दवात पाय भिजवत मी धुंद गिरक्या घ्याव्या आणि तोल जाऊन पडण्याच्या आत अगदी अलगत झेलून वारयावर स्वार व्हावा माझा मृत्यू ......'
         आणखीही वाटतं की वाघासारखा रुबाबदार आणि राजेशाही असावा माझा मृत्यू ....तस्साच हिंस्त्र.... सोनाळ्या उन्हात लखलखता देह घेऊन रुबाबात चालणाऱ्या वाघुल्यापेक्षा नखं परजणारा पेटल्या डोळ्यांचा शिकारी वाघ लै म्हंजे लैच आवडतो मला. त्याची भीती वाटत नाही असं नाही...ती वाटतेच पण प्रेम जास्त वाटतं....
        भो मृत्यू, कसाही ये. कोमल वा विकराळ.... तुझी दोनही रूपं भारी आवडतात मला... मी खूप मणजे खूप आसुसून वाट पाहते आहे तुझी....
         कॉलेजच्या १ल्या २या वर्षी आमचे सचिन प्रवीण म्हणायचे," कौमुदी तुझ्या डोळ्यात वाट दिसते गं" ..तेव्हा हे सांगताच येत  नव्हतं मला ... सुरवातीचं अपयश पाहून डिप्रेशन आलंय म्हणाले असते सारे .. आताही काही खूप यश पाहिलंय असं नव्हे ...अवघड वाटा सोप्या वाटतायेत इतकंच. पण म्हणून वाटत असलेली आंतरिक ओढ कमी झालीये असं मुळीच नाही ....दिवसागणिक ती आपली वाढतेच आहे एव्हढे मात्र खरं. सरणारा एकेक दिवस मला जणू मैलाचं अंतर कपात माझ्या हृदिस्थाकडे घेऊन जातोय असं वाटतं.....त्याची ओढ आहे म्हणूनच जगण्याचा एकेक क्षण enjoy करते मी....मुक्त मुक्त होऊन भेटायचे म्हणून ज्या क्षणी ज्या वेगाने जागून घेता येते ते घेते. तुकोबा म्हणतात  ते  खरेच  खरे  आहे  "मरणाचे  स्मरण  असावे" ....
खरेच  असावे ...
तू  यावे  म्हणुनी
पायघड्या  जगण्याच्या
नाही  मागे  उरणे
सोस  पुरव  सारण्याचा
डोळे  निवून  जाती
उशीर  तुझ्या  दिसण्याचा
चेतवला  तू  वन्ही
हा  गुन्हा  का  पतंगाचा
वर्णनाने  भारावले  आहे हे  खरेच  पण  त्याहूनही  काळाच्या  दूर  असण्याने  भारावले  आहे....  Thee Godess of death come soon....I'm waiting for you....


सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

धावा


मी रंगले समाधीत
तू अंतरी उमलशी राजा
तुजपाशी सारी गुपिते
गुपितांचा गाजावाजा

तुजसाठी रोजच चाले
जगण्याचा आटापिटा
तुजपयी पांडूरंगा
माझ्या मर्तिकाच्या विटा

जळो जावो दु :ख सारे
सुखे अंतरी जळेन
थंड चंदन जळते
जरा इथे आकळेल

नको डोळ्यात आसवे
आसवांत ओघळशी
का रे मला तू जाळतो
का तू माझ्यात जळशी

जळो जावो मारो सारे
असे जळणे तळणे
पुरे झाले बरे आता
असे छळून छळणे

उभी काळसर्पयोगे
पुरे मरण पासंगा
प्राण जाई डोळ्यांतून
आता यावे पांडुरंगा
-कौमुदी(५ ऑग. २०११)


शून्य


या शून्यापासून
त्या शून्यापर्यंत
अखंड प्रवास...
बदलाचा
उन्नतीचा
उत्थानाचा ध्यास...

शून्य....पूर्ण सत्य .
चकचकीत मिथ्याला
गिळून बसलेले
ना सरले..
ना उरले..
अखंड पसरलेले ....

किमपि न अंतर
चिरकालीन
निरंतराचा वास
हे शून्य ...ते
ते शून्य .....
किती मोठा प्रवास
                    -कौमुदी (April 2010)

जोगिया


जरी जोगिया तू | सोडला संसार
तरी त्याचा भार | तुला आकळला ||

नि:संग होऊन | धरिला तू पार
मायेची पाखर | परि आठवते ||

सागराच्या आत | जशी खळबळ
तुझी चुळबूळ | तशी रे चालली ||

परि तू न जाशी | परतुनी देवा
वाटे तुझा हेवा | सदैवची ||
                              -कौमुदी (२००८)



मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०११

विरहिणी

दवबिंदुंचे सिंचन घेऊन ...
हिरवे गर्द अवगुं
न लेऊन ...
सजलेली मी!
अभ्राच्छादित तुझ्या मुखाचे चुंबन घेते
शतजन्मांची तान्हेली मी
... तुज सखया रे ....
मम पीडेचे दर्शन देते....
गाते मी गीत तुझ्या प्रीतीचे
तव
तृप्तीचे बीज उरी साठवते
अंकुरते मी तुझिया अस्तित्वातून
मी सखया रे तव प्रीतीतच न्हाते

... स्पर्श तुझा हिरवा हिरवा
मम काया नीलकांती होते
हरवून धुक्यात निळाई
आंतरी अस्तित्व तुझे शोधते
तव प्रेमदिठीला पारखीच
हि विरहिणी झुरते
हृदयंगम लेऊन पिवळा शेला
तव क्रोधकटाक्षी जळते 

हे तप्त तापसा हि

प्रेम तपस्या स्वीकारुनिया घे रे
मी पृथ्वी तव आंतरभावी
तू मम प्रेमाम्बर हो रे !!!
                             -कौमुदी